प्राणीसृष्टी

राईच्या पायवाटेवरुन परवा जात होतो, तर पायाखाली एक गवताची काडी तुरुतुरु पळत होती!

turu turu

turu turu

तहकीकात केली तर तो एक किडा होता. Praying Mantis असावा.

Banana plantation

There is a well tended and lush green Banana plantation on the way to Raee. It was planted the very year when we started our Raee venture. We have seen the first Banana trees grow by almost another foot every time we visited Raee on weekends.

Since then Abhay had this idea of planting Banana trees on Raee. He had also decided on the place for them. The lower left corner, where the water accumulates during rainy season. As you know Banana trees need lot of water. So the corner was deemed the ideal place for them.

Now with Bore well in place, it would be easier to water the trees. Any way with onset of the Monsoon, trees will not need watering for next 2 - 3 months. 

Abhay mentioned his idea of planting Banana trees to his friend from Jalgaon. Jalgaon is very famous for its Banana crop. The friend volunteered to send some Banana saplings.

On last Friday, he called Abhay from Jalgaon and said that 25 saplings were on their way. They are of the Mahalakshmi variety. They would reach the city on Saturday morning. So early morning saw us at the bus stand, wondering how are we going to transport these 25 saplings to Raee. But turned out that these were 25 corms, what we call “kand” in Marathi. They were well packed in a gunny bag. We took them to Raee.

The pits of 1 x1 foot were already ready.  We added some BSC powder for pest control and some manure as fertilizer.  Refilled the pit.

Planted around 9 – 10 corms in separate pits. Watered them.

 

We are already dreaming of Banana barfi and Banana cakes :)

आणि या मातीतुनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला,

या तरुंनी आनंदे पालवावे!

बराच काल उलटला, इथे नोंदी करायला जमले नाही. पण सांगायला आनंद होतो की राई सुखात आहे. बहरते आहे. तळंगभुत सर्व तरुवेली,  वनचर, विहंग मजेत वाढत आहेत.  

काल परवा लावली असे वाटत होते तोवर ही रोपे बघता बघता रुजुन, तरारुन भरा-या मारु लागली आहेत. उंचीला माझ्यावर गेली आहेत!


 

गेली दोन वर्षे पाण्याची सोय करायला नाही जमले. शंकरनाना आणि निवृत्तीमामा जवळच्या नदीवरुन आणुन झाडांना पाणी घालतात.  आता ह्या वर्षी मे महिन्यात बोअर खणली. सांगायला आनंद होतो की तिला छान पाणी लागले. दोनशे फुटापर्यंत खोल नेली आहे.

राईवर आम्ही गेल्या दोन वर्षात ब-यापैकी उद्योग केले.

  • मेथी लाउन बघितली ती वाहुन गेली.
  • जीवामृत तयार केले, त्याने आधी झाडांना आंघोळ घातली, तर ती गेली गुदमरुन, मग त्यांची पानं धुवुन काढली. आता ते झाडांच्या मुळात घालतो तर ती तरारत आहेत.
  • झाडांना दशपर्णीचे औषध घातले.
  • पालवीच्या ऋतुत म्हणजे वसंताच्या आधी मग परत आषाढाआधी आणि सावन-भादोत बांगडी पद्धतीने खत दिले. हे झाडांना चांगले मानवले.
  • उन्हाळा बाधु नये म्हणुन बाळांना टोप्या घातल्या
  • लिंबावरच्या अळ्या खुन्नस घेउन मारल्या :)
  • झेंडुच्या फुलांची पैदास केली
  • मोठे प्लॅस्टिक पैदा केले, त्याचा वापर जांभळाचे झाड गदागदा हलवुन जांभळे गोळा करण्यासाठी केला. राईवरच्या दोन आधीच असणा-या झाडांना मस्त चवदार आणि भरपुर जांभळे येतात.  या वर्षी भरपुर खाल्ली.
  • शेजारचा फणस बरका आहे बरका, त्याचे गरे चापले.
  • तुतीला अप्रतीम फळे आली, ती आधाश्यासारखी खाल्ली.
  • लिंबे आहेत – नाही ईडलिंबे आहेत – नाही लिंबेच आहेत हा खेळ खेळलो
  • राईवर निवांत बसुन राहिलो आणि आपण केवळ वर वर जाणारी धुराची लकेर आहोत अशी कल्पना केली आणि डोंगराएवढे झालो.

- तर जे वाट्टेल ते केले. आणि जेंव्हा वाटले नये करु काही तेंव्हा नाही केले!  राईने आम्हाला खुप काही दिले, आम्ही विनासंकोच घेत गेलो.

जीवामृत – झाडांचे टॉनिक

जीवामृत

१० लीटर गोमुत्र

१ किलो गुळ

१ किलो बेसन

१ घमेले जागेवरची माती

३ – ४ घमेले शेण

१०० लीटर पाणी

सर्व एकत्र करुन एक आठवडा ठेवावे. रोज एकदा हलवावे. नंतर, तयार झालेले द्रावण झाडांच्या बुंध्यात-मुळांत खताप्रमाणे घालावे. झाडांवर उडवु नये.

गुळ व बेसन या अन्नामुळे मातीतले जीवाणु वाढतात. हे जीवाणु मातीतील खानिजे व अन्नद्रव्ये झाडाला खाण्याजोगी करतात.

First Flowers on Raee

First Jaswand flower

Amba1

Amba2

Topya

Bogun vel

घुमड घुमड कर आई रे घटा!

झाडे तर सगळी नीट लावुन झाली. आठवडाभर रापा पडल्या. रापा म्हणजे मान्सून सुरू होण्या आधीचा सॅंपल पाऊस! झाडं आपल्या जागी रुळु लागली. हा पाउस थोडा सौम्य असल्याने झाडांना रुळायला थोडा वेळ मिळाला.
rope1.jpg
तसा आम्ही पुढचा उद्योग हाती घेतला.
झाडांना आधाराला बांबुचा सांगाडा बांधणे. जोराच्या वादळा पावसात झाडांना आधार द्यावा लागतो, नाहीतर एकतर ती उन्मळुन पडतात नाहीतर सारखी हलत राहिल्याने, मुळ नीट पक्की होत नाहीत.
वर वळण्याला जाउन बांबू सांगितले, ट्रॉलीत घालुन शंकरनाना घेउन आले, आणि त्याचे मांडव बांधले. 
bambu hause
हे होते न होते तोवर मात्र जोरात पाउस लागला.  आता उलट परिस्थिती झाली. आपण झाडाला घातलेलं पाणी आत रहावं म्हणुन अळं करतो तर इथे बाहेरुन जोरात वाहणारे पाणी मुळाशी साचु नये म्हणुन आळं करायचं आणि आतल्या पाण्याला रस्ता द्यायचा, मुळाशी थोडी भर टाकायची.
कुंपणाला जोर यावा म्हणुन बांबु लावले आणि तळाचा भाग काही ठिकाणी दगड लावुन भरुन घेतला.
kumpan.jpg
शंकर नाना आणि निवृत्तींनी हौसेने तुळस, गुलाब, मोगरे आणुन लावलेत.
जास्वंद, बोगनवेल, मिरीचे वेल लावुन झाले.
आता झाडे मस्त डोलत आहेत. चिकु सगळ्यात आधी तरारला. मग पेल्टो आणि गुल. आता लिंब. आंबे आजुन पालवले नाहीत पण मजेत आहेत.
घुमड घुमड कर आयी है घटा
बरसो रे नीर बरसो रे नीर
हरसु अब हरियाली छटा
बरसो रे नीर बरसो रे नीर! 

राई रखमाबाई राणी या सकळा

कामाचा सूर mast चांगला जुळू लागला. अभय जवळ जवळ रोज सकाळी राईवर चक्कर मारत होता. सकाळी उठुन आधी राई मग ऑफिस. आणि ऑफिसला जायला उशीर म्हणुन यायला उशीर. खड्डे पडु लागले. शेणखत आलं दोन ट्रॉल्या. गांडुळखत मेहंदळे गॅरेजजव्ळुन उचललं. मग बाया पण कामाला बोलवल्या. गडीमाणसं खड्डे पाडत होती. बाया, शेणखत, गांडुळखत आणि माती मिसळुन ते परत भरुन घेत होत्या

middleview.jpg

हे सगळे होत असताना लक्षात आले की या सगळ्या झाडांना कुंपण हवे. नाहीतर हौसेने लावलेली झाडे, गाई-बक-यांचे जेवण व्हायची. सिमेंट पोल्स, काटेरी तारा असं साग्र संगीत कुंपण घालयचं म्हणजे बराच खर्च आला असता. मग मध्यम मार्ग शोधला. एकुण २३ सिमेंट पोल घ्यायचे ठरवले. मग विश्वनाथचे वायदे, पोल्स आज येतील, उद्या येतील. त्यानंतर त्याच्यावर बाईंडींग वायर ओढुन घ्यायची होती. पोल्स अजुन लागत होते. मग एक दिवस परत एकदा सगळ्या टोळीने सीमा बांधणी केली. अभयने इतक्या वेळा इतक्या लोकांबरोबर त्या बॉर्डरच्या खुंट्यांवरुन दोरी ओढुन बघितले आहे की बस. एकी कडे पोल्स लागत होते आणि एकी कडे खड्डे भरणे चालले होते. पावसानी जरा उसंत दिली आहे.

left_side_view.jpg

right.jpg

ढग येउ लागले आहेत पण पावसाचा अजुन पत्ता नाही. हा आठवडा तर मिळाला. शुक्रवारी झालेल्या कामाचा आढावा घेतला आणि ठरवले की शनीवार रवीवारात झाडे लावायची. शरद काकांच्या हस्ते पहिले झाड लावुन सुरवात करायची. पण शुक्रवारी कळले की काकांना बरे नाही. मग इतर तरी झाडे लावुन घ्यायचे ठरवले.

pavasali.jpg

 

पावसाने अजुनही हजेरी लावली नव्हती, म्हणुन एकीकडे हायसे वाटत होते आणि एकीकडे काळजीही वाटत होती. कारण झाडे लावायला वाव मिळणार होता. हा बाबा जर आधीच कोसळला तर खड्डे तुंबणार, खत वाहुन जाणार, आणि झाडे लावायलाही कटकटीचे जाणार. आणि नाहीच आला तर झाडांच्या पाण्याचा प्रश्न. शनीवारच्या मोहीमेची तयारी केली. गडी सांगितले, खड्डे आणि कुंपणासाठी. आणि ५ बाया, रोपे ने-आण, पाणी घेउन येणे घालणे या साठी. कृषी अधिकारीही बघायला येतो म्हणाले. जमिनीच्या व्यवहारापासुन आमच्यासाठी काम करणारा मनोहर ही दोन दिवसांपासुन राईवर देखरेख करायला येत होता. हे झाडांचे काम काढल्यावर कळले की किती मनुष्यबळ लागते. मला वाटते ह्याचसाठी पुर्वी अष्टपुत्र लागत असणार!! दुसरी कायम अडचणीत टाकणारी गोष्ट म्हणजे परिवहन (ट्रान्स्पोर्ट!) शेणखत जागेवर स्वस्त वाटते पण ते राईवर वाहुन आणायचे म्हणजे ट्रॉलीचा खर्च आला. तसाच पोल्स, बांबु, रोपे, दगड सर्वात, परिवहनाचा जिझिया धरावा लागतो.

khadda.jpeg
topview_khadde.jpg
fertilizing.jpg

 

शनिवारी चिनीची शाळा झाल्यावर, जेउन निघालो. वाटेत कृषी अधिकारी, मनोहर असे पॅसेंजर घेत राईवर पोचलो. दळ वाटच बघत होतं. आधी आंब्याची झाडं लावायला घेतली, भरलेल्या खड्याच्या मध्यभागी एक बेतशीर खड्डा खोदायचा, पाणी घालुन तो ओला करायचा, मग रोपाच्या मुळांभवतीची पॉलिथीन पिशवी कापुन अलगद, मुळांना धक्का न लावता, काढायची, मग ते रोप त्या खळग्यात, उभे धरुन माती भरायची. रोपाचा डोळा भरला असेल तर तो मातीवर राहील अशी काळजी घ्यायची. मग ते रोप पायाचा अंगठा आणि पहिलं बोट या मध्ये धरुन, बाजुची माती बेतशीर दाबत गोल फिरुन अळं तयार करायचं आणि शेवटी त्या आळ्यात कळशीभर पाण्याचं अर्घ्य द्यायचं. निघालेली पॉलिथीनची पिशवी उचलुन घ्यायची नाहीतर, त्याचा कचरा होणार.

jhade_lavane_1.jpg
jhade_lavane_2.jpg
jade_lavane_3.jpg

 

मग हीच प्रक्रीया पुढच्या झाडासाठी! झाडांसाठी लागणारं पाणी पार अर्ध्या किलोमीटरवरुन आणावं लागत होतं. त्यामुळे बायकांची रांग पाण्यासाठी. एकीकडे झाडे लावत होतो, गडी कुंपणाच्या तारा ओढुन घ्यायला लागले होते. कृषी अधिका-यांना परत जायला लिफ्ट मिळाल्याने ते लवकरच परत गेले. तीनच्या सुमारास अभय आणि चिनी जाउन सगळ्यांसाठी वडापाव घेउन आले. मग आम्ही पाच वाजेपर्यंत काम करत होतो. ब-यापैकी आंब्याची झाडं लावुन झाली. आणी त्या दिवशी थांबायचे ठरवले. बारीक पाउस पडुन गेला. पावसाची गम्मत चालु होती. कधी धरणात पडताना दिसायचा, कधी सुरेशसाहेबांच्या शेतात तर कधी आमच्या राईवर गुलाबजल शिंपडुन जायचा.

त्या दिवशी काम संपल्यावर आम्ही धरणाच्या पलिकडच्या बाजुला असलेल्या बंगल्यावर थांबलो. या जागेची माहिती आम्हाला अचानकच मिळाली. ८-९ खोल्यांची सोय असलेल हा बंगला – धरण – बॅकवॉटर-डोंगररांगा यांचं विहंगम दृष्य दिसेल अश्या डोंगर उताराच्या १५ एकरावर वसला आहे. शहरातल्या एका वकिलांनी आधी स्वत:साठी बांधलेलं हे नंदनवन आता इतरांसाठीही उपलब्ध करुन दिलं आहे. दमुन आल्याने अंग चांगलं दुखत होतं. बाहेर हिरवळीवर बाक टाकुन, ढगांचा लपंडाव, आणि सायंता-यांची हळुह्ळु निखरत जाणारी आरास बघत गप्पा मारताना, शीण निघुन गेला. उन उन आमटी भात खाउन डोळा कधी लागला ते समजलेच नाही.

khire.jpg

दुस-या दिवशी इडलीचा नाश्ता करुन राईवर आलो. आता एकीकडे कडेची फुलझाडे लावायला घेतली. आणि अभय ने कुंपणाचे काम जोरात सुरु केले. बाया आणि मी झाडे लावत होतो. उठ-बस आणि वाकुन कंबर चांगलीच लागुन येत होती. आपण किती ‘बिनकामाचे’ आहोत याची जाणीव होत होती. आज गुलमोहोर, पेल्टॊफोरम, तामण, बहावा, सोनचाफा, नारळ, तुती, आवळा, चिकू, जांभूळ, रातांबे अशी निरनिराळी झाडे मधल्या खड्यात लावली. रातांब्याची दोन-दोन झाडं एका खड्ड्यात लावली. आता नर मादी कळले की कोणती ठेवायची ते ठरवायचे.

झाडं लावुन झाली आणि पाउस चांगला लागुन आला. काय बरं वाटलं! काम तर झालं होतं, आणि आसुसलेल्या जमिनीला आणि नुकत्याच रुजलेल्या झाडांना तृप्त करत सरी बरसु लागल्या.

जीव कसा सुपाएव्ह्ढा झाला. अभयने गेला आठवडाभर लावुन धरलेला नेट, गेले दोन दिवस आम्ही करत असलेली मेहनत सगळे सफल झाले. पावसानं साथ दिली, दान आमच्या बाजुनं पडलं. रोपांबरोबर आम्हीही त्या धारा झेलत उभे राह्यलो. गालावर ओघळलेलं सगळंच पाणी पावसाचं नव्हतं.

शर्यत

कालच्या कोकणस्वारीनंतर अभय दमला होता पण अजुन खुप कामं राहिली होती. तिथे गेल्यावर बघितले तर मंगळवारचा वायदा करुन खड्डे झालेच नव्हते. जे झाले होते ते योग्य खोलीचे नव्हते. शंकर दोन दिवस झाले येत नव्हता. रोपे तर येउन दाखल झाली होती. वर जाउन बघितले तर शेळ्या मोकाट चरत, राईपर्यंत पोहोचल्या होत्या.

हे सर्व पाहिल्यावर, आम्ही हाती घेतलेल्या प्रकल्पावर अजुन खुप काम बाकी आहे हे प्रकर्षानं जाणवलं. अजुन सगळे खड्डे व्हायचे होते, मधले खड्डे व्हायचे होते, शेणखत आणायचे होते, शेळ्यांमुळे जाणवले की कुंपणही तातडीने घालायला हवे. प्रसंगाचे गांभीर्य जाणवायला लागलं निवृत्तीच्या बोलण्यात आले की हे नक्षत्र- मृग तर असेच उन पाउस जाईल पण पुढचे आर्द्रा मात्र बरसेल. म्हणजे आमच्याकडे उणेपुरे दहा-बारा दिवस आहेत. तोवर झाडे लागायला हवीत, एकदा पाउस सुरु झाला की चिखलात रोपे कुजुन जातील. वेगाने कामे व्हायला हवीत.

अभयने मग निर्णय घेतला, की आता जोर लावायलाच हवा. असे शनीवार – रवीवार राईवर येउन भागणार नाही.

आज गेलो तर , शंकर उगवला होता, काल जळण भरायला गेला होता. अजुन माणसं सांगितली होती त्यांचा पत्ता नव्हता. दळ हलवायला हवे होते.

बाळुने सल्ला दिला की लमाण लोकांना बोलावुन काम करुन घ्यावे. पण मग ठरवले की नाही काम गावातल्या लोकांना द्यावे. त्यांना रोजगार मिळेल. बाळुने गावातल्या माणसांना बोलवुन आणले. वसंत आणि अशोक. त्यांना खड्डे पाडायचे काम अंगावर दिले. नवीन खड्ड्याचे ६० रु आणि जुने खड्डे ३ x ३ x ३ फुटाचे करायला २५ रु. असा सौदा पटला. तीन जोड्या बोलावुन बुधवारपर्यंत काम होईल म्हणाला.

शंकर आणि निवृत्ती यांना खड्ड्याच्या जागा मार्क करणे, खत उतरवुन दगड लावुन ठेवणे, कंपाउंड साठी तयारी करणे ही कामे दिली आहेत.

बाळुने सिवील कामे करणा-या विश्वनाथशी गाठ घालुन दिली. हा कुंपणाचे सिमेंट पोल्स, कुंपण काम, फॅब्रिकेशन, बांधकाम सगळे करतो. त्याला १५ पोल्स ची ओर्डर दिली आहे. ३० रु. फुटाप्रमाणे ६ फुटाच्या प्रत्येक पोलची किंमत १८० रु. सोमवारपर्यंत पोल्स राईवर येतील. बांबु सांगितले आहेत. पोल्स मग सिमेंट कॉंक्रीटमध्ये बसवुन, मध्ये बांबु घालुन, बाईंडींग तारेचे कुंपण घालायचे ठरवले आहे. हे थोडे कमी पक्के असेल, पण एकतर, समथींग इज बेटर दॅन अगदीच नथींग! आणि पुढे हे पोल पक्क्या कुंपणात वापरता येतील.

सोमवारी खताची ट्रॉली येईल. ते मातीत मिसळुन टाकुन घ्यायचे आहे. या आठवड्यात अश्या प्रकारे सर्व तयारी पूर्ण करायला हवी. अभयला पुढच्या आठवड्यात जवळ जवळ रोज राईवर चक्कर टाकावी लागेल नाहीतर कामे व्हायची नाहीत. पुढच्या शनीवारी रोपे लागायला पाहिजेत.

मोठी हातघाई चालु आहे खरी. पण ही जमीन कसायची हौस आहेच तशी नख-याची! येरागबाळ्याचे काम नोहे. हिम्मत हवी आणि पैशाचे पाठबळ हवे.

एक मात्र खरं की या सर्व खटाटोपामुळं  जमिनीची, निर्मितीची नवनवीन रुपं मात्र जवळुन पहायला मिळतात.

आमच्या हालचालीवर नजर ठेवणरा डोंगरांएवढाच पुरातन सरडा, आठवड्याला फुटाफुटानं वाढणा-या केळी. जळीत जमिनीवर जोमानं वाढणारे कसदार वेल, आर्द्र पण भुसभुशीत, रोपांसाठी आसुसलेली जमीन, मातीचे वेगवेगळाले पोत, काही झाडांची भोळी पोपटी पालवी, तर काहींची आग्रही आणि उग्र जांभळी तांबडी. माणसांची जळण भरायची लगबग तर मुंग्यांची अन्नकण साठवायची.

आत्तापर्यंत ‘नक्षत्र’ हे विशेषण होतं माझ्यासाठी, आता ते मॄग आणि आदडा(आर्द्रा नव्हे) होऊन शर्यत लावायला लागलं आहे. सत्तावीस वजा सात ही माझ्यासाठी आता गोष्ट नाही राहिली. तुम्हाला सांगते, राईचा सगळा आसमंत, जमीन, झाडं हवा, डोंगर हे सगळे निर्मितीच्या शक्यतांनी ओथंबुन, खोळंबलेत, मला तो रेटा माझ्या रंध्रात जाणवतोय, मी श्वास रोखुन खेळी करतेय. आणि देवाजीकडे मागणं मागतेय की दान आमच्या मनाप्रमाणे मिळो.

 

रोप ट्रीप टू दापोली

कृषी आधिकारी, अभय आणि जमिनीच्या व्यवहारापासुन अनेक कामात बरोबर असणारे मनोहर असे तिघे महिंद्र पिक अप ट्रक करुन दापोलीला रोपे आणायला गेले.

मंडळी सकाळी सहाला निघाली. ताम्हिणी घाट ओलांडुन, माणगाव, महाड करत १२ वाजेपर्यंत दापोलीला पोहोचली. तर विद्यापीठ रोपवाटीकेची जेवणाची सुट्टी झालेली. आता २ वाजेपर्यंत थांबणे आले.

मग दापोलीच्या डॉ कोपरकरांच्या नर्सरीत गेले. तिथुन फुलवृक्ष, जास्वंदीचे नाना रंगा, आकारा, छटांचे दहा एक प्रकार (अभयला जास्वंदी फार आवडतात!) दोन त-हेचे सोनचाफे, पिवळा आणि केशरी, रंगी बेरंगी बोगनवेली अशी खरेदी केली.

विद्यापीठ नर्सरी उघडायला पावणेतीन वाजले. पण तिथली झाडे मात्र नामी होती, जवळच ज्या मातृवृक्षापासुन ही रोपे तयार केली, ते आंबा, रातांबे नुसते फळाने लहडले होते. सगळ्या फळझाडांची खरेदी झाली, चिंच आणि सीताफळ तेव्हढे मिळाले नाही. ती देशावरची झाडे, राहुरीला घेतली पाहिजेत. मजल दर मजल करत ही वृक्षदिंडी रात्री १० च्या सुमारास राईवर पोहोचली. बाळुच्या घरी सगळी रोपे उतरवली. ह्या घाईत अभयचा मोबाईल कुठेतरी पडला. पण नंतर परत वळणावर जाउन शोधला तर सापडला. आपटल्याने, डेटालॉस मात्र झाला. अभयला घरी यायला सव्वा अकरा वाजले. पुरता दमला होता बिचारा. परत उद्या राईवर जायला हवेच होते…

 

दापोली रोप ट्रिक – इतर तपशील:

पिक अप ट्रक – ३५००

मनोहर – ५००

 

कोप्स नर्सरी गर्हे, दापोली (डॉ कोपरकर)  - फोन – ०२३५८-२८४५७८ मोबाईल – ९४२२४३१२५८

चिकु – ५ – ३० प्रमाणे

लिंबु – ६ – २०

मिरी – २ – ५

तुती – २ – १०

रक्तचंदन – २ – २५

पेल्टोफोरम – ४- २०

कडुनींब – २ – १५

तामण – ४ – १५

पेरु – ४ – २५

बहावा – ३ – १५

फणस – १ – ४५

पिंपळ – २ – २५

सोनचाफा – ४ – ५०

कामिनी – २ – १५

गुलमोहोर – ४ – २५

कदंब – २ – १५

बोगनवेल – १२ – ४०

जास्वंद १६ – २०

जास्वंद (खास!) १ – ५०

बदाम – २ – १०

 

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली

जांभुळ – १० – १५

रातांबा – (कोकण अमृता) १० – १५

आवळा – (नरेंद्र – ७) ५ – २५

नारळ (टी डी) ३ – ४०

आंबा – केशर – ३५ – २५

रत्ना – १० – २८

हापुस – २५ – २८

तोतापुरी – ५ – २८

 

एकुण रोपांचा खर्च – २७३० रु.

पुर्वतयारी

आधी विचार करत होतो की या हंगामात फक्त कडे कडेने फुलणारे वृक्ष लावायचे. खड्डे करायला घेतले होतेच.

पण मग विचार झाला की हे वर्ष कशाला वाया घालवायचे? सगळ्या जमिनीवर झाडे लावावीत. तेवढीच झाडे वाढतील. खड्डे घ्यायचे काम जोरात सुरु केले. त्यात निवृत्ती आणि शंकर यांच्या घरच्या कामांची पण घाई, पाउस यायच्या आधी भात पेरायचे होते. जळण आणुन साठवायचे होते. तरी मंगळवार पर्यंत करतो म्हणाले.

कोणती झाडे आणावीत? कशी लावावीत? यावर विचार केला. मुख्यत: आंबे, रातांबे, आवळा, चिकु, पेरु, जांभुळ, नारळ, मिरी ही फळझाडे, गुलमोहोर, पेल्टोफोरम, तामण, बहावा, बुच, सोनचाफा हे फुलवृक्ष. कडुनींब, पिंपळ, कदंब, रक्तचंदन हे संस्कृतीवृक्ष अशी निवड केली. ऍग्रोवन साइटवरुन चांगल्या जाती कुठच्या हे टिपुन घेतले.

तसे कुठली झाडे लावायची? जमीन, हवामान, पाणी कशाला अनुकुल आहे? असा उहापोह सतत चालु असायचाच. त्या अभ्यासात आणि इतरही ठिकाणी दापोलीच्या कृषी विद्यापीठाला सर्वांनी पहिला क्रम दिला होता. अभयच्या स्वभावानुसार त्याने आधीच ठरवले होते की आपण एवढ्या निगुतीने सांभाळणार, तर रोपे प्रथम प्रतीचीच हवीत. तेंव्हा दापोलीला जाणे क्रमप्राप्त होते. रोपांची यादी शंभर सवाशेपर्यंत पोहोचली. तेंव्हा इथुनच ट्रक करुन जायचे ठरले. पाउस उंबरठ्यावर येउन ठेपला होता, त्या आधीची वेळ साधायला हवी होती. येता शनीवार, दुसरा शनीवार असल्याने, विद्यापीठाला सुट्टी. तेंव्हा अभयने शुक्रवारी सुट्टी टाकली.