धान

बटाटे आणि भुईमुग झाल्यावर ह्या पावसाळ्यात भात लावायचा बेत केला. मुळशी भागात प्रचलित असलेला इंद्रायणी आणि हौस म्हणुन बासमती.
दोन खाचरात टोकण पध्दतीने इंद्रायणी लावला. या पद्धतीत भाताची थेट पेरणी होते. परत चिखल करुन लावणी करावी लागत नाही. भात थोडा कमी येतो पण लेबर कमी लागते.
बासमती पारंपारिक पद्धतीने लावला आणि बसलो पावसाची वाट बघत. आधी पठ्या आलाच नाही, मग खाचरं भरेपर्यंत बरसला नाही. मग एकदाचा आला. मग लावणीची धावपळ!मग मात्र खाचरं हिरवीगार दिसु लागली.

जसजशी सावन-भादोचा उन पावसाचा खेळ सुरु झाला, तसं भात निसु लागलं ओंब्यांवर आलं. बासमती आधी झाला आणि इंद्रायणी नंतर.

आता भात कापायला झालाय तर परतीच्या पावसाने परत खेळ मांडलाय, पठ्या संपायलाच तयार नाही! खाचरात उभं पीक झोपायला लागेल.
असं असतं नाही शेतक-याचं, सगळं निसर्गावर अवलंबुन!

Advertisement
This entry was posted in cultivation. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s